shape not found
shape not found


          या दिवशी, 26 जानेवारी रोजी, आपण त्या क्षणाचे स्मरण करतो जेव्हा 1950 मध्ये आपली राज्यघटना लागू झाली, ज्याने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक बनवले. स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर बांधलेल्या या ऐतिहासिक घटनेने आपल्या देशाच्या इतिहासातील एका नव्या अध्यायाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिनाच्या (गणतंत्र दिनाच्या) निमित्ताने, आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या लोकशाहीवर आणि स्वातंत्र्यावर अभिमान व्यक्त करावा. हा दिवस आपल्याला आपल्या अधिकारांची आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो. 

  • प्रजासत्ताक दिन म्हणजे थोडक्यात माहिती 
    १ . दरवर्षी 26 जानेवारीला भारत प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, कारण या दिवशी 1950 साली भारताचे संविधान लागू झाले. 
    २. हा दिवस आपल्याला लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांची आठवण करून देतो. 
    ३. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि लोकशाही मार्गावर वाटचाल सुरू केली. 
    ४. आज आपण या दिवसाचा अर्थ आणि महत्त्व ओळखून, आपल्या देशासाठी चांगले योगदान देण्याचा संकल्प करूया. 

           भारतालाया ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले.[] यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.

    २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.[] या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.